in

मराठी सुविचार

मराठी सुविचार

मराठी सुविचार

  1. ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते>
  2. जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात
  3. जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही
  4. मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे
  5. समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे अहंकार, धनाचे गर्व ते काय कामाचे?
  6. समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय
  7. विषयाचे चिंतन हा भोग आहे. इश्वराचे चिंतन हा योग आहे
  8. आईच्या प्रेमळपणाने पाठीवरुन हात फिरवुन केलेला उपदेश सार्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो
  9. आपल्यातुन सर्वत्र आनंदाचा वर्षाव करता आला पाहिजे. आपल्या कार्यातुन तो व्यक्त झाला पाहिजे
  10. अंहकाराचा नाश तेथे सुखाचा वास. तुमच्या चांगल्या – वाईट कॄत्यांची नोंद परमेश्वराजवळ आहे
  11. परोपकारी सज्जन त्यांचा विनाशकाळ आला तरी त्यांचा सस्वभाव सोडत नाहीत. तुटता तुटता चंदन कुर्हाडीलाही सुंगंधीत करते
  12. श्रम, विश्रांती व पुजा या मनवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत, असे प्रत्येक धर्म सांगतो
  13. समाधान म्हणजे मनाची संपत्ती. ज्याला ती गवसली तो सुखी
  14. ज्यावेळी अहंकार नाहिसा होतो, त्यावेळी आत्मा जागृत होतो
  15. आत्मविश्वास हि यशाची गुरुकिल्ली आहे
  16. योग्यता कामावर अवलंबुन नसते, ती काम करणार्यावर व कामावरिल त्याच्या प्रेमावर असते..
  17. क्रोध म्हणजे गांधीलमाशीच्या मोहळावर फेकलेला दगड
  18. मान ज्याने पचवला तो सत्पुरूष झाला
  19. काम थोडे करा किंवा जास्त करा ते कधी फुकट जात नसते, करणार्याची वॄद्धीच होत असते
  20. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे मात्र तो मोबदला जबरदस्त घेतो
  21. माणसाचे मोल डोक्यावरील मुकुटाने आणि गळातल्या जडजवाहिर्यांनी होत नाही, तर त्याच्या अंतःकरणातील माणुसकीत आणि मनगाटातल्या पराक्रमांनी कळते
  22. आपल्या छोट्या घरात सुद्धा सुखामॄत भरलेले असताना बाहेरिल सुखाच्या मॄगजळामागे जो धावतो तो एक मुर्ख होय
  23. सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतु:सुत्री आहे
  24. स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःला कमी लेखणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे होय
  25. कॄतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलासारखे भासतात, काट्यांची मखमल होते
  26. जो नेहमी दुसर्यांवर टिका करतो, तो दु:खीच होतो, ज्याचे मन सदा धर्मरत राहतं, त्याला देव देखील नमस्कार करतो
  27. वाचन हा जसा आचाराचा सारथी, तसा प्रयत्न हा विधीचा म्हणजे दैवाचा सारथी
  28. माता आणि मातॄभूमी यांचा विसर पडू देऊ नका
  29. खोटे बोलण्याने माणुस काही मिळवेलच असे नाहि, पण स्वतःवरिल लोकांचा विश्वास तो गमावून बसतो
  30. गर्विष्ट मनुष्य आपली स्तुती स्वतःच गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते
  31. माणुस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे
  32. ईश्वराचे भय हे सर्व रीतीने मूळ आहे
  33. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते
  34. कोणताही भार आनंदाने उचलला म्हणजे तो हलका होतो
  35. निंदकाची खोड मोडण्यास दुसरे औषध नाही, मात्र उत्तर करू नये व हसण्यावर घालवावे
  36. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाशी गाठ पडलीच

5 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध

हाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…