in

जैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे?

हि आहे जैतापूर प्रकल्पाची सच्चाई

१. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. मुळात हा प्रकल्प भारत सरकारचा National Nuclear Project आहे. भारत आणि फ्रांस या दोन देशांमध्ये झालेला हा करार आहे.

२. National Nuclear प्रोजेक्ट असल्यामुळे या जैतापूर प्रकल्पामधून निर्माण होणारी विजेवर देशातील सर्व राज्य यांचा हक्क असणार आहे. महाराष्ट्राला जैतापूर प्रकल्पा मधून फक्त १०% वीज मिळणार आहे आणि ती पण महाराष्ट्राला पैसे देवून विकत घ्यावी लागणार आहे.

३. म्हणजे जमीन, पाणी सगळे महाराष्ट्राचे, धोका राहणार कोकणातील लोकांना आणि फायदा उठवणार देशातील इतर लोक.

४. जैतापूर भागामध्ये २००९ पासून ९२ वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. उद्या जपानसारखा भूकंप जैतापूर मध्ये झाला तर अख्खा महाराष्ट्र नष्ट होवू शकतो.

५. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राला देवून भारत सरकार ने महाराष्ट्राला मदत केलेली आहे. मुळात हा प्रकल्प गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनी आपल्या राज्यामध्ये उभा करायला नकार दिला होता. शेवटी भारत सरकारने हा जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्रजनतेच्या बोकांडी मारलेला आहे.

जैतापूर प्रकल्पाची सच्चाई
जैतापूर प्रकल्पाची सच्चाई

६. अणुप्रकल्प हा समुद्र किनारी असतो कारण त्या प्रकल्प मधून बाहेर टाकले जाणारे अनु जल समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले जाते. कोकणातील सुंदर समुद्र किनारा, तेथील सुंदर निसर्ग या जैतापूर प्रकल्पामुळे कायमचा नष्ट होवू शकतो.
हजारो कोटीचा हा जैतापूर प्रकल्प असल्यामुळे आणि अमेरिकेचा दबाव या दोन कारणामुळे महाराष्ट्र सरकार कोकणातील जनतेच्या मुळावर उठलेली आहे. पैसे घेवून बातम्या देणार पत्रकार आणी मिडिया जाणूनबुजून बदनामीच्या बातम्या देत आहेत. आमचे महाराष्ट्रा मधील सर्व जनतेला आणि सर्व राजकीय पक्षांना खुले आवाहान आहे कि हा जैतापूर प्रकल्प महाराष्ट्राची भावी पिढी नष्ट करून शकतो हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि सर्व राजकीय पक्षांनी या जैतापूर प्रकल्पाला विरोध करावा.

 

आपण आपली मते खाली असलेल्या कमेंट बॊक्स मधुन मांडा.

9 Comments

Leave a Reply
  1. उद्या संपूर्ण महाराष्ट्राला धोका होणार असेल तर हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत जैतापूर येथे होऊ देता कामा नये..!

  2. जैतापूर प्रकल्प हटाव…..महाराष्ट्र बचाव……….

  3. जैतापूर प्रकल्प सरकार माथी मारणारच !

  4. जैतापूर प्रकल्प सरकार जबरदस्तीने माथी मारणारच !

  5. Udya tumachyach ghrat amhi yeto, ani tumhi saglyanna sanga ki amhi alyamule tumachyavar khup upkar zalet..
    Ani nantar tumhala tumachyach gharat kelelya jevanachya 10% Jevan vikat ghya..
    Ani mag tumhala kay vatel…???

    Are laaj kashi vatat nahi ya Sarkar la…Aaan khate ka Shen????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Hindu

हिंदू मना बन दगड

गोपीनाथ मुंडे साहेब आणि फेसबुक