in

राज संन्यास – नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड?

नाटकार रा. ग. गडकरि
नाटकार रा. ग. गडकरि

काल राम गणेश गडकरीनी लिहिलेलं राज संन्यास हे नाटक वाचलं आणि त्यांच्या विषयी असणारा थोडाफार आदर भुर्रकन उडून गेला. खरं पाहता गडकरींनी शंभू राजांबद्दल वापरलेले शब्द कोणासाठीही वापरू नयेत असे आहेत. परंतु त्यांचा पुतळा फोडण्यामागे हे नाटक आणि त्यातील मजकूर असेल असं वाटत नाही, कारण हे नाटक प्रकाशित होऊन एक शतक (शंभर वर्षे) लोटलं आहे आणि या पूर्ण शतकात हे नाटक कोणीच वाचलं नसेल असं म्हणण मूर्खपणा असेल. हे कृत्य शंभू प्रेमातून नक्कीच झाल नाही. तस असत तर छत्रपती संभाजीं राजेंना हाल हाल करून मारणाऱ्या औरंजेबाची कबर आधी फोडली असती. परंतु त्याची कबर फोडून काही राजकीय लाभ होणार नाही हे बिग्रेडी चांगलेच ओळखून आहेत. ब्राम्हण आणि मराठा वाद पेटवून देण हा बिग्रेड चा आवडता छंद आहे.आणि हा प्रकार निव्वळ ब्राह्मण द्वेषातून झालेला आहे न कि शंभू प्रेमातून.

गडकरीचा पुतळा फोडण्या आधी किती लोकांना त्यांचा पुतळा संभाजी उद्यानात आहे हे माहिती होत? किती लोकांनी राज संन्यास हे नाटक वाचल होत? किती जणांना रा. ग. गडकरी माहित होते?

जे नाटक आधी ४ लोकांनी वाचल होत ते आता यांच्या उथळपणा मुळे लाखो लोकांनी वाचल. यांच्या मुळे काळाच्या पडद्याआड गेलेले ते शब्द पुन्हा एकदा घराघरात पोचले. मागच्या शंभर वर्षात जेवढ्या लोकांनी ते नाटक वाचलं नसेल त्याच्या पेक्षा जास्त लोकांनी मागच्या दोन दिवसात ते वाचल. जर या लोकांना संभाजी महाराजांबद्दल खरच प्रेम आणि आदर असता तर त्यांनी पुतळा फोडून याच राजकारण न करता त्यांनी या पुस्तकावर बंदीची मागणी केली असती जेणेकरून हे साहित्य पसरण्यापासून रोखता आल असत. प्रसिद्धी पाई महाराजाबद्दलचा बदनामीकारक मजकूर जाणूनबुजून सोशल मेडिया वर पसरविणारे हे लोक देखील त्या गडकरी इतकेच दोषी आहेत. तो मजकूर जाणूनबुजून पसरविण्यात आला जेणेकरून मराठा तरुणांचे डोके भडकून देऊन त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा समाज कंटकांचा मनसुबा होता. परंतु महाराष्ट्राची जनता असल्या प्रयत्नांना भिक घालणार नाही.

गडकरींचा पुतळा फोडून ब्राह्मण समाजाला डीवचायाचं आणि एका ब्राह्मणानं आपल्या राजाची बदनामी केली आहे असं बोलून मराठ्यांना भडकून द्यायचं आणि मग आपण मजा पाहत बसायचं हा त्यांचा डाव होता जो कि चांगलाच फसला आहे.

आपल्याकडे पुस्तकांवर बंदी घालणे हि नवीन गोष्ट नाही. मुस्लिमांच्या भावना दुखावणारया सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या “सतनिक वर्सेस” वर १९८८ मध्ये बंदी घातली होती. याच आणखीन एक ताज उदाहरण म्हणजे सोनिया गांधी बद्दल आक्षेपार्ह मजकूर असणार रेड सारी ह्या पुस्तकावर तत्कालीन रालोंआ सरकारने बंदी घातली होती. म्हणून छत्रपतींची बदनामी करणाऱ्या राज संन्यास या नाटकावर बंदी घालायला हवी जेणेकरून बदनामीकारक मजकूर सोशल मेडिया वर पसरविला जाणार नाही.

गडकरीचा पुतळा फेकुन देणाऱ्यांनी अजून पण त्या पुस्तकावर बंदी घालायची मागणी केलेली नाही यावरून आपल्याला कळून येत कि राजांची बदनामी रोखण हा उद्देश्य नसून त्याच्या बदनामीच भांडवल करून स्वतःचा फायदा करून घेण आहे.

संभाजी महाराजांची बदनामी करणार नाटक लिहिणाऱ्या गडकरीचा निषेध आणि आणि त्याच भांद्डल करून जातीय तेढ निर्माण करण्याच प्रयत्न करणाऱ्या बिग्रेडचा पण जाहीर निषेध.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय | पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि जय.

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natsamarat Moview Review

नाना ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’

लालक्रांती

लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ