in ,

‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा

राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा ‘मराठी माणूस’ काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे. आपण आमच्यासारख्या माणसांकडून ‘मराठी माणूस’च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे.

अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी कधी इतिहासाच्या पानांत हरवून जायला आवडत असले तरी सर्वसामान्य माणसांना मात्र वर्तमानाच्या चौकटीत राहून भविष्याचा विचार करणे जास्त आवडते.

गेल्या काही दिवसांत देशभरातील लोकांनी मराठी माणूस हे नाव वारंवार ऐकले. दूरचित्रवाणीवरील सर्व वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये त्याची व्यंगचित्रे सगळ्यांनी पाहिली. मुंबई शहर कोणाच्या बापाचे? सारखे सवाल ऐकले. जळणाऱ्या बसगाड्या, रस्त्यावर उतरलेले लोक, दगडफेक पाहिली, नारेबाजी ऐकली. या सगळ्या चचेर्त सतत एका युवा नेत्याची छबीसुद्धा पाहिली. त्या छायाचित्रातील व्यक्तीच देशभरात चचेर्ला कारणीभूत ठरली. राज ठाकरे, हे त्या माणसाचे नाव. वयाने छोटेखानी वाटला तरी मुंबईतील नव्याकोऱ्या विरोधी पक्षाचा हा प्रमुख. त्यानेच भारतीय राज्यघटना, महाराष्ट्र सरकार या दोघांनाही आव्हान दिले-आ बैल मुझे मार!

हल्लीच्या राजकारणात हे असेच सुरू आहे. आपणही या सगळ्याला ‘रिआलिटी शो’ किंवा ‘रोड शो’ला मनोरंजनाचे नवे माध्यम मानायला लागलो आहोत. जोवर प्रत्यक्ष आपल्यावर हल्ला होत नाही तोवर या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. काश्मीरपासून केरळपर्यंत, गुजरातपासून ओरिसापर्यंत किंवा कर्नाटकपासून आसाम आणि मणिपूरपर्यंत घडत असलेल्या अशा कितीतरी लांच्छनास्पद घडामोडींना आपण ‘राजकारण’ मानून दुर्लक्ष करतो. एकट्या बिचाऱ्या ‘मराठी माणसाला’च आरोपीच्या पिंजऱ्यात कशाला उभे करावयाचे? शेवटी महाराष्ट्र हा ही देशाचाच घटक नाही का?

पण, थांबा जरा! राजसाहेबांच्या मते महाराष्ट्र हा जरी भारताचा घटक असला तरी येथे नोकरी-कामधंद्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून लाखो लोक घुसखोरी करीत आहेत आणि यापुढेही घुसतच राहतील. त्यांना रोखण्याचे काम महाराष्ट्राच्या सरकारने केले नाही तर त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरून ते करेल. त्यांच्या दृष्टीने हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्ान् आहे.

राजकारणात प्रत्येक घटना तिच्या नियोजित वेेळीच होते किंवा घडवून आणली जाते. आगामी काळ हा देशभरात निवडणुकांचा आणि म्हणूनच नेत्यांसमोरच्या आव्हानांचा आहे. सध्या महाराष्ट्रात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांंचे आघाडी सरकार आहे. त्या दोन पक्षांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. विरोधात शिवसेना आणि भाजप हे समोर उभे ठाकले आहेतच. इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघटना आपापल्या मतपेढ्यांची पुंजी घेऊन या मोठ्या पक्षांकडे जातील आणि त्यांना परस्परांवर बंदुका चालवण्यासाठी आपापले खांदे भाड्याने देतील.

अर्थात, यामुळे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिस्थितीत कायसा फरक पडणार? महाराष्ट्राची संस्कृती तसेच भविष्यातील विकास यावर काय परिमाण होईल? या सगळ्यामुळे महाराष्ट्राची ताकद वाढून दुनियेत महाराष्ट्राचे मोठे नाव होणार आहे का? संत-महंत, ज्ञानी-पंडित, वीर आणि त्यागी नेत्यांची ही महाराष्ट्राची कर्मभूमी हा नवा भार कसा काय पेलू शकेल? राज ठाकरे हे काही शिवाजी महाराज नाहीत किंवा संत तुकारामही नाहीत. ते जयंत नारळीकरही नाहीत किंवा सचिन तेंडुलकरही नाहीत. ते आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. बाळासाहेबांचा मुलगा नसल्याने शिवसेेनेचे सि

9 Comments

Leave a Reply
  1. नमस्कार मी आशिष गोडसे आपल्या महाराष्ट्र माझा या ब्लॉग चा नियमित वाचक आहे. आपल्या ” ‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा ” या लेखात आपणास नेमके काय सुचवायचे आहे किंवा काय म्हणावयाचे आहे हे समजत नाहीये. लेखाच्या नावावरून विषय समजू शकतो पण लेख समजला नाही. आपण ” परीक्षा रेल्वे बोर्डाचीच! ” या लेखावरील माज्या कमेन्ट ला रिप्लाय दिला नाहीये कारण समजू शकेल का मला??????

  2. धन्यवाद आशिष… हा लेख मी इथे केवळ चर्चा घड्वुन आणण्यासाठी मि टाकलेला आहे. हा लेख मी लिहीलेला नसुन लेखकाचे नाव दिले आहे. मराठी माणसे जिथे परप्रांतीय आहेत, म्हणजेच महाराष्ट्रा बाहेरील मराठी माणसाचे विचार इथे लेखकाने व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे.मी तुझ्या मागच्या कंमेंट्सला सुद्धा रिप्ल्याय दिलेला आहे.नियमीत पणे ब्लॉगला भेट देउन माझा उत्साह वाढवणार्या सर्वांना आणि तुला, धन्यवाद.आशिष कुलकर्णी.ब्लॉगर

    • are thoda aapla maharashtra raj sahebanmule naraj aahe tar mag evdhe varsh delhi vallyancha annyay sahan kela aata pan kara karan marathi mansala nehamich delhi aavadte karan te afjal kahanchi enaval hoti aatachi ji raj sahebanna pathimba detat ti kahare shivaji maharajanchi sena jara vichar kara mag bola

  3. ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ‘संवाद’ पुरवणीत ‘थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा!’ असा लेख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने चालवलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लिहिला होता. या लेखावर कवी-लेखक सलील वाघ यांची ही सविस्तर प्रतिक्रिया http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3746149.cmsइथे वाचा ह्या लेखा वरची प्रतिक्रिया आणि मग कमेंट्स द्यायला विसरु नका. जय महाराष्ट्र!

  4. आररे २ महिने झाले तरी मी पोस्ट केलेल्या पोस्ट वर कोणाचा रिप्लाइ नाही …कोण काय बोलणार बोलण्या सारखे काही आसेल तर बोलावे … जय महाराष्ट्र!

  5. शरमिंदा होण्यासारख्या हजार गोष्टी आजुबाजूला असताना मराठीच्या स्वाभिमानाबद्दल कोणी मराठीच्या बाजूने बोलताना जर आपल्याला शरमिंदा व्हावंसं वाटत असेल तर एक लेखक म्हणून ती फारशी सन्मानाची गोष्ट नाही, जे लोकं सरळसरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे किंवा जनता दलाचे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांची पक्षनिष्ठा समजू शकते. पण चित्रे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत किंवा जदचेही प्रचारक नाहीत, ते एक लेखक आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते अणि त्यांच्याशी मतभेद नोंदवणे गरजेचे वाटते. 

  6. मला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे तो बर्याच इतर गोष्टींमुळे खर्या अर्थाने आपण सर्वांनी भविष्याचा विचार करायला हवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!

‘सुपरफास्ट’ कॉम्प्युटर